महाराष्ट्र भाजपाचे प्रवक्ते
शिरीष बोराळकर
शिरीष बोराळकर हे भारतीय जनता पार्टीशी संबंधित राजकीय नेते आहेत. हे अष्टपैलू व्यक्तिमत्व राजकारण, क्रिडा, पत्रकारिता आणि व्यवसाय अशा विविध क्षेत्रांत यशस्वी ठरले आहे. व्यक्तिशः, आपली मते प्रामाणिकपणे आणि खुलेपणाने मांडणारे आणि प्रशंसा झाली तर तिला दिलखुलास स्मिताने दाद देणारे हे आनंदी व्यक्तिमत्व आहे. राजकीय क्षेत्रात गेल्या तीन दशकांपासून ते सक्रीय आहेत आणि भाजपामध्ये विविध राजकीय पदांद्वारे जनतेच्या तसेच देशाच्या सेवेसाठी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत.
शिरीष बोराळकर यांचे स्वप्न आणि व्हिजन
- त्यांची पात्र तरुणांसाठी अधिकाधिक नोकरीच्या संधी निर्माण करून मराठवाड्यातील रोजगाराचा दर वाढवणे हा त्यांची व्हिजन आहे. त्यांच्या मते, मराठवाड्यातील तरुणांनी स्वतःचा न्यूनगंड दूर केला पाहिजे कारण त्यामुळे ते ज्यांसाठी पात्र आहेत अशा संधी त्यांना कधीही मिळत नाहीत. मराठवाड्यातील बुद्धिमान तरुणांना येथेच रोजगारांच्या संधी उपलब्ध केल्यास विभागाची प्रगती होऊ शकते असा त्यांचा दृष्टीकोन आहे.
- 'स्कील इंडिया' पुढाकारावर त्यांचा दृढ विश्वास आहे आणि तरूणांनी रोजगार देऊ शकणाऱ्या कौशल्यांमध्ये नैपुण्य मिळवण्याचे ते समर्थन करतात. त्यांच्या मते, युवकांना स्वतःच्या जीवनात सर्वोत्तम ते प्राप्त करण्यासाठी अधिक जाणीवजागृती करण्याची आवश्यकता आहे.
- विविध सार्वजनिक योजनांद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच देवेंद्र फडवणीस यांचा ज्या सुधारणा घडविण्याचा प्रयत्न राहिला आहे, त्यात त्यांचा पूर्ण विश्वास आहे. लोकांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे त्यांना वाटते, त्यासाठी त्यांनी योजनांची माहिती प्रत्येकापर्यंत पोचविण्यासाठी उपक्रमांची आखणी केली आहे.
- कार्यरत असलेल्या व्यक्ती तसेच बेरोजगारांच्या अधिक प्रगतीसाठी जे जास्तीत जास्त करणे शक्य आहे ते आपण भारतीय जनता पार्टीच्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघ मतदार नोंदणी प्रकल्पाचा प्रमुख म्हणून केले पाहिजे, असे त्यांना वाटते.
- शिक्षक, डॉक्टर, वकील, सनदी लेखापाल (सीए) इत्यादी व्यावसायिकांपुढच्या अडचणी ठळकपणे मांडाव्यात असे त्यांना वाटते. प्रोफेशनल्सना शक्य तितकी सर्वोत्तम रिसोर्सेस आणि पाायभूत सुविधा प्राप्त करण्यात साह्य करण्याचा त्यांचा मनोदय आहे जेणेकरून ही मंडळी भारताला अधिक मजबूत बनविण्यात योगदान देऊ शकतील.
ध्येयपूर्ती
- श्री लालकृष्ण अडवानी आणि प्रमोद महाजन यांना सुवर्णजयंती रथयात्रेत साह्य केले. महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि इतर अनेक राज्यांत त्यांनी विस्तृत कार्य केले.
- मराठवाड्यातील महिला क्रिकेटमधील पहिल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचे (ओडीआय) संघटन कार्य त्यांनी संघटन सचिव या नात्याने पाहिले (भारत विरुद्ध न्यूझिलंड, २००३- २००४)
- महाराष्ट्रातील खेळाडूंना दिला जाणाऱ्या सर्वात प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती राज्य क्रिडा पुरस्काराचे ते विजेते आहेत. असामान्य कामगिरी आणि संघटन कौशल्यासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
- मराठवाडा भूषण पुरस्कार, औरंगाबाद पर्ल पुरस्कार आणि उद्योगरत्न पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.
- अनेक बॅडमिंटन आणि क्रिकेट खेळाडूंना त्यांनी खेळाचे प्रशिक्षण दिले. त्यांनी कोचिंग दिलेल्यांपैकी ऋचा शिंदे यांनी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारही प्राप्त केला आहे.
- औरंगाबादमध्ये नवरात्र महासंघाची स्थापना त्यांनी केली त्यामुळे दांडिया आणि गरबा याचे सुविधाजनक आयोजन सुरु झाले.